आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

By : Polticalface Team ,16-10-2024

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

निवडणूक विशेष :निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. पण आचारसंहिता म्हणजे काय? ती लागते म्हणजे नेमकं काय होतं? हेच जाणून घेऊयात...

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दुपारी साडेतीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही पत्रकार परिषदे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आजच म्हणजेच निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. यापूर्वीही तुम्ही आचारसंहिता हा शब्द अनेकदा ऐकला असेल. मात्र आचारसंहिता आजपासून लागणार म्हणजे काय? त्याच सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार? हेच जाणून घेऊयात..


 *आचारसंहिता म्हणजे काय?*

 भारतामधील सर्व निवडणुका या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात. देशात निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे व्हाव्यात याची सर्व जबाबदारी आयोगावर असते. यासाठीच त्यांनी राजकीय पक्ष, उमेदवारांना काही नियम घालून दिले आहेत. याच नियमांना सर्वसाधारणपणे आचारसंहिता असं म्हणलं जातं. निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी हे नियम म्हणजेच आचारसंहिता पाळणं बंधनकारक असतं.

 *केंद्रीय निवडणूक आयोगाला कारवाईचा अधिकार* 

कोणत्याही उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने या नियमांचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार असतो. अनेकदा अशाप्रकारच्या कारवाया यापूर्वी झालेल्या आहेत. एखाद्या गंभीर नियमाचं उल्लंघन करत आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवारावर निवडणूक लढवण्यास बंदीही घातली जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करुन अगदी तुरुंगावासाच्या शिक्षेचीही तरतूद यामध्ये आहे.


निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर असलेल्या आचारसंहितेविषयीच्या माहितीमध्ये प्रचारसभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयीचे नियम आणि अटी दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाने काय करावं आणि काय करु नये, त्यांचा एकंदरित व्यवहार कसा असावा याचबरोबर मतदान केंद्रावर उमेदवारांना काय करण्याची मूभा आहे आणि ते काय करु शकत नाही याचा उल्लेख आचारसंहितेमध्ये असतो. निवडणुकांदरम्यान सत्ताधारी पक्षाने कसं वागावं, त्यांची भूमिका कशी असावी याचाही उल्लेख आचारसंहितेमध्ये असतो. 

 **परवानगीशिवाय काहीही करता येत नाही* 

सार्वजनिक ठिकाणी कुठेही राजकीय झेंडे, बॅनर, जाहिराती, पत्रके असं काहीही लावण्यापूर्वी त्या जागेच्या मालकाची परवानगी आवश्यक असते. यामध्ये घरं, जमिनी, होर्डिंग, कोणताही परिसर किंवा अगदी साधा कम्पाऊण्डच्या भिंतीवरही जाहिराती लावताना परवानगी बंधनकारक असतं. अशी परवानगी नसल्याचं आढळलं तर तो आचारसंहितेचा भंग ठरतो.

 *सर्वसामान्यांसाठी काय बदलणार* ?

सामान्यपणे आचारसंहिता ही उमेदवार आणि पक्षांसाठी त्यामुळे याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होत नाही. दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत नसला तरी मतदानाच्या दिवशी अनेक गोष्टींची सर्वसामान्यांनीही काळजी घेणं गरजेचं असतं. एकाद्या पक्षाचा प्रचार करत असणाऱ्यांना मात्र कोणत्याही नियमांचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते.


 *मतदानाच्या दिवशी...* 

आचारसंहितेमधील नियमानुसार, मतदानाच्या दिवशी मतदान असलेल्या भागांमधील दारूची दुकानं बंद ठेवावी लागतात. प्रचारादरम्यान तसेच मतदानाच्या दिवशी दारू तसेच पैसे किंवा कोणत्याही भेटवस्तू वाटण्यास मनाई असते. मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमणार नाही यासंदर्भातील दक्षता घेण्याचा उल्लेख आचारसंहितेमध्ये आहे. मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या पक्षांच्या बूथवरुन प्रचारसाहित्य किंवा मतदारांना प्रभावित करणारी कोणतीही गोष्ट अथवा खाण्यापिण्याची व्यवस्था असू नये असं केंद्रीय निवडणूक आयोगाची आचारसंहिता सांगते. 


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद

नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान

खत आणि त्यावरील जबरदस्तीने दिले जाणारे खत; याबाबत शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात..!

दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.

कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक दोन्ही रूमच्या कुलपांना सिल केल्या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.

कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा

परिक्रमा तंत्रनिकेतनच्या कबड्डी संघाचे घवघवीत यश

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे मढेवडगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने माजी सेवा निवृत्त पोलीस दिलीप निवृत्ती दोरगे यांचा जागीच मृत्यू.

सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा

५१ हजार रूपयांच्या देणगीतून साकारतेय सभामंच व ध्वजस्तंभाचे काम - शिंदे वहिनींच्या दातृत्वाला सलाम! !

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे

श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि जीवन सुंदर बनवा - सुरेंद्र गुजराती

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन