श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीकडून 40 वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभार, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा आरोप

By : Polticalface Team ,30-10-2024

श्रीगोंद्याच्या लोकप्रतिनिधीकडून 40 वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभार, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचा आरोप

लिंपणगाव( प्रतिनिधी):- ८० च्या दशका पर्यंत स्व.शिवाजी राव नागवडे यांनी दुष्काळी आणि खाजगी साखर कारखान्याच्या मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना साखर कारखान्याचा मालक बनवून तसेच पाटपाणी उपलब्ध करून शिक्षणाची सुविधा तालुक्यात सुरू करून विकसित श्रीगोंदा तालुक्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले पण पुढे ४० वर्षे केवळ घोषणा आणि गलथान कारभारामुळे श्रीगोंदा मतदार संघात विकास केवळ कागदावर राहिला कुकडी प्रकल्प पूर्ण झाल्यावर बागायती क्षेत्र वाढले; पण दरवर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी द्यावे लागते तर काहींनी बागा मोडून टाकल्या एमआयडीसी चे स्वप्न विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेकदा दाखवले काही गावांचे नकाशे दाखवले पण आजही ही योजना कागदावरच आहे. आजही तालुक्यातील कुशल,अकुशल कामगार नगर,कुरकुंभ, कारेगाव,रांजणगाव येथील एमआयडीसी मध्ये कामाला जाताना दिसतो उद्या यात कर्जतच्या एमआयडीसी ची भर पडली तर नवल वाटायला नको. साकळाई उपसा जलसिंचन योजना देखील कागदावरच आहे. अनेकांनी घोषणा केल्या सर्व्हे देखील झाला पण कोळगाव,चिखली आणि नगर तालुक्यातील या योजनेच्या लाभक्षेत्र मध्ये येणारी गावे आजही तहानलेली आहे यासर्व दुर्लक्ष कारभारामुळे जनता आता बदलाच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होणार असल्याने भाजप आता उमेदवार बदलाच्या तयारीत आहे पण विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक,शेतमजूर,शेतकरी या राजकीय अनस्थेला वैतागला आहे म्हणून परिवर्तन अटळ आहे. असे. राजेंद्रदादा नागवडे यांनी म्हंटले असून; 

श्रीगोंदा तालुका वेगाने वाढत आहे पण रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मध्यंतरी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या निविदा निघाल्या कामे सुरू झाली पण टक्केवारीचा खेळ सुरू झाला आणि रस्त्यावरचे डांबर खडी घेऊन बाहेर पडले पुन्हा रस्त्यांची दुरवस्था सुरू झाली आहे. .

पाण्याचे न्याय वाटप,विसापूर खालील  ८ गावांचा समावेश,वितरिका क्रमांक १० ची मंजुरी, डिंभे - माणिकडोह बोगदा, टेल टू हेड आवर्तन मधील श्रीगोंदा तालुक्या वरील अन्याय हे सारे प्रश्न आजही भेडसावत आहेत यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. यात कहर म्हणजे नगर - दौंड रस्त्यावरील टोल नाका परिसरातील वाहन चालकांना यातून सुट न दिल्याने नाराजी आहे निवडणूक डोळ्या पुढे ठेऊन महिनाभर टोल वसुली बंद आहे पण पुढे काय ? हा प्रश्न स्थानिकांना आहे. .

कोरोना काळात लोकप्रतिनिधी कोविड सेंटर सुरू करण्याऐवजी स्वस्थ बसले नागरिक आपल्या परीने उपचारासाठी इतरत्र धावपळ करत होते. पण लोकप्रतिनिधी मौन बाळगून बसले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना मार्फत चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी कोवीड सेंटर सुरू केले.

गेल्या ५ वर्षात नागरिक विविध दाखले,रेशनिंग कार्ड,साठी शासकीय कार्यालयात धावपळ करत राहिले  पण  प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांना लोकप्रतिनिधी जाब विचारू शकले नाही,सर्वच शासकीय कार्यालयात नागरिकांना पैसा आणि वेळ खर्च करावा लागला,श्रीगोंदा पेक्षा भौगोलिक आणि लोकसंख्येने कमी असलेल्या कर्जत मध्ये अद्यावत शासकीय रुग्णालय असताना श्रीगोंदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कागदावर राहिले आजही सोनोग्राफी,सिझर साठी खाजगी दवाखाने किंवा दौंड,शिरूर,नगरला धाव घ्यावी लागते.,श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्मचारी वसाहत नाही,पोलीस ठाणे ब्रिटिश कालीन जुन्या तहसील कार्यालयात कामकाज पाहत आहे. इतर तालुक्यात झपाट्याने काया पालट होत असताना श्रीगोंदा तालुक्यातील जनतेला बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळेच या मतदार संघात केवळ आमदाराचे पुत्र सर्व्हे मध्ये मागे पडले नाही तर भाजपच मागे पडली आहे.जनतेला आता बोले तैसा चाले याप्रमाणे शेतकरी,शेतमजूर,रुग्ण,विद्यार्थी यांच्यासाठी झटणारे नागवडे कुटुंबाला  मतदार संघात प्रतिसाद मिळत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये; असेही मा. राजेंद्रदादा नागवडे यांनी शेवटी  म्हंटले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी