महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

By : Polticalface Team ,15-11-2024

महाविकास आघाडीच्या उमेदवार  सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे श्रीगोंदा - प्रतिनिधी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातुन महविकास आघाडीचे उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांना विधान सभेत पाठवा.तालुक्यात विकास काय असतो ते महविकास आघाडी दाखवून देईल.तालुक्याचा घोड,कुकडी, व साकळाई पाणी योजना मार्गी लावू असे मत राज्याचे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ठाकरे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,खा.फोजिया खान,शिव व्याख्याते शेख सुभान अली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की,अपक्ष उमेदवार जनतेशी गद्दारी करत आहेत. अनुराधाताईंचा विजय निश्चित आहे, मात्र आडकाठी करणारे गद्दार ठरणार.” ठाकरे यांनी पंधराशे रुपयांत महिलांना नोकरदार करणाऱ्या राजकारण्यांवर टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांचा देव नरेंद्र मोदी आहे, तर आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपले दैवत शिवराय असल्याने जय शिवराय हीच आपली घोषणा आहे,” अशा ठाम शब्दांत त्यांनी मतदारांना अनुराधाताई नागवडे यांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन केले. सभा सुरू झाल्यावर सामाजिक पदाधिकारी सुभान अली सह बाबासाहेब भोस, सुनंदा पाचपुते, घनश्याम शेलार, अनुराधाताई नागवडे यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. अनुराधा नागवडे यांनी आपल्या भाषणात श्रीगोंद्यातील सामान्य लोकांविषयी आपुलकी व्यक्त केली आणि प्रस्थापित राजकारण्यांवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले की, “श्रीगोंद्यातील सामान्य जनतेला तळहाताच्या फोडासारखं जपलं आहे, परंतु इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी मदतीसाठी दोनदा आमच्याकडे येऊनही कधीही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही.” याच संदर्भात त्यांनी अपक्ष उमेदवारांवरही टीका करत, “घनश्याम अण्णांनी आम्हाला मदत करून उपकृत केले, मात्र अपक्ष उमेदवारांमध्ये ती दानत नाही,” असे स्पष्ट केले. नागवडेंनी आणखी सांगितले की, “चाळीस वर्षांपासून पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहे, आणि अजूनही त्याचे समाधान झालेले नाही. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची प्रशासनाकडून तपासणी केली जाते, तर दुसरीकडे पुलवामा सारख्या गंभीर मुद्द्यांची तपासणी एवढ्या तत्परतेने केली असती तर दुर्घटना टळली असती..” शासनाच्या अपयशाचा उलगडा करत त्यांनी शेतकरी, महिलांची सुरक्षितता, आणि श्रीगोंद्याच्या व्यापारी राजकारणावर भाष्य केले. “शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. “श्रीगोंद्यात जिथे राजे व्यापारी झाले आहेत, तिथे जनता भिकारी होणारच,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. तसेच, तालुक्यातील प्रलंबित आणि मूलभूत प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था यांवर प्रकाश टाकला. “५० खोके/ओके.. या सरकारात भ्रष्टाचार झाला आहे. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन हवे,” असे ते म्हणाले. थोरातांनी कुकडी कारखान्याचा इतिहास सांगत, “बापूंच्या संमतीमुळेच कुकडी कारखाना सुरू झाला,” असे नमूद केले. यावेळी मिलिंद नार्वेकर, राजेंद्र नागवडे, शशिकांत गाडे, साजन पाचपुते, दीपक शेठ नागवडे, घनश्याम आण्णा शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल्स महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजपूरकर, सुनंदा पाचपुते, प्रशांत दरेकर, आदेश नागवडे, बाळासाहेब दुतारे, विजय शेंडे, बंडू तात्या जगताप, संतोष इथापे, भाऊसाहेब गोरे, बाळासाहेब दुतारे, संतोष खेतमाळीस, जहीर जकाते, शरद पवार, बाळासाहेब नलगे, निशांत लोखंडे,यांच्यासह कार्यकर्ते,पदाधिकारी व असंख्य महिला,पुरुष व तरुण उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी