श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

By : Polticalface Team ,17-11-2024

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

लिंपणगाव प्रतिनिधी :

श्रीगोंदा तालुक्याच्या जडण घडणीत दिवंगत आमदार शिवाजीराव नागवडे व त्यांच्या कुटूंबियांचे सर्वाधिक  योगदान असून,आमदारकीवर सर्वात जास्त नैतिक अधिकार नागवडे कुटूंबियांचाच आहे असे प्रतिपादन श्रीगोंदा वकील संघाचे माजी अध्यक्ष व श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक ऍड.सुनील कांतीलाल भोस यांनी केले आहे.

ऍड.भोस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. बॅलेट मशीनवर जसे सर्वात प्रथम नाव सौ.अनुराधा राजेंद्र नागवडे यांचे आहे हा एक शुभ शकुन आहे की निकालात देखील सौ.नागवडे यांचा क्रमदेखील सर्वात वर असणार आहे.कै. शिवाजीराव बापू नागवडे यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणली.सुमारे पाऊण शतक त्यांनी अहोरात्र विकासकामे केली.त्यांच्या पराकाष्ठेमुळे सध्या तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे.बापुंच्या स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी आता त्यांच्या स्नुषा सौ.अनुराधा वहिनी निवडणुकीस उभ्या आहेत.त्यांना आमदार करून श्रीगोंदा तालुका राज्याच्या नकाशात उच्चस्थानी नेण्याची अपूर्व संधी चालून आली आहे.

बहुरंगी लढतीत सर्वाधिक मेरिट असणारे उमेदवार म्हणून सौ.नागवडे यांच्याकडे जनता आशेने पाहत आहे.त्यांना आमदार करण्यात तालुक्यातील प्रत्येक लहान-मोठ्या घटकांचा हातभार लागत आहे.

नागवडे कुटूंबियांची खासियत म्हणजे त्यांनी आजवर सदैव दिलेला शब्द पाळलेला आहे.मविआच्या जाहीरनाम्यात व शिवसेना(उबाठा)च्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करण्याचे काम सौ.नागवडे या करतील.२०१४ साली कै. बापू यांनी केलेल्या त्यागामुळेच तालुक्यात सत्ताबदल झाला.बापूंच्या त्यागातून ज्यांनी आमदारकी मिळवली त्यांना पुढे सत्तेची ऊब लागल्यावर या त्यागाचा विसर पडला.कुकडी साखर कारखान्याची उभारणी व २०१४ ला मिळालेली आमदारकी यात नागवडे कुटूंबियांचे लाख मोलाचे योगदान आहे.त्याची उतराई करण्याची संधी अपक्ष उमेदवाराला आली होती.मात्र उतराई न करता नागवडेंना आडकाठी करण्यात त्यांनी धन्यता मानली.त्यांच्या या कृतीची तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.मतपेटीतून जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.सर्व बाबीचा  साकल्याने विचार करता सौ नागवडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा दावा ऍड.भोस यांनी पत्रकात केला आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी