By : Polticalface Team ,17-12-2024
नंदकुमार कुरुमकर लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा लिंपणगाव- काष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गावरील लिंपणगाव काष्टीच्या मध्यावर असणाऱ्या रेल्वे गेटवर तातडीने उड्डाणपुलाची उभारणी करण्यात यावी; अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून केली जात आहे. दरम्यान काष्टी- लिंपणगाव रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाला यापूर्वीच मंजुरी मिळाली असल्याचे समजते. परंतु उड्डाणपुलाच्या कामाबाबत अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचे काम हाती न घेतल्याने या प्रश्न नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रशासकीय पातळीवर तातडीने लक्ष घालून या उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावावा; अशी मागणी वाहन चालकांमधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी हा उस्मानाबाद लातूर नावहरे मार्गे; इनामगाव; काष्टी तांदळी काष्टी; पुढे लिंपणगाव मार्गे हा रस्ता आढळगाव कडे मार्गस्थ झाला आहे. या राष्ट्रीय महामार्गातून दळणवळणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दररोज हजारो वाहने या राष्ट्रीय मार्गातून मार्गस्थ होत आहेत. परंतु काष्टी- लिंपणगाव रेल्वे गेटचा वाहनचालक व प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांमधून व्यक्त केला जात आहे. प्रवासी व वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार लिंपणगाव- काष्टी रेल्वे गेट हे वारंवार रेल्वे गाडीमुळे तासंतास बंद असते. साधारणता मिळालेल्या माहितीनुसार दौंडकडून रेल्वे सुटल्यानंतर लिंपणगाव- काष्टी रेल्वे गेट संबंधित कर्मचारी गेट तात्काळ बंद करतात. अशा वेळेस काही हृदयविकाराचे रुग्ण तसेच प्रस्तुत महिलांना तातडीने दौंड अगर काष्टीकडे दवाखान्यात घेऊन जात असताना रेल्वे गेट बंद अवस्थेत असल्यामुळे अशा वेळेस प्रस्तुत महिलांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतो. याची कुठेतरी नोंद रस्ते विकास महामंडळाने घेतली पाहिजे तशा भावना प्रवाशांमधून व्यक्त केल्या जात आहेत. त्याबरोबरच हृदयविकाराचा रुग्ण देखील वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रेल्वे गेट बंद असल्याने दगावले जात आहेत. ही देखील गंभीर बाब आहे. त्यामुळे लिंपणगाव- काष्टी रेल्वे गेटवर उड्डाणपूल तातडीने होणे तितकेच प्रवासी; वाहनचालक व रुग्णांच्या दृष्टीने तितकच महत्त्वाचे समजले जाते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तत्कालीन खासदार दिलीपजी गांधी यांनी यापूर्वी खासदार असताना या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेटचा प्रश्न मार्गी लावल्याचे समजते. त्यानंतर माजी खासदार सुजेय विखे पाटील यांनी देखील या मंजूर उडान पुलासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पुढे मात्र या उड्डाण पुलाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित राहिल्याचे समजते. आता नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके हे या भागाचे खासदार आहेत. तर भाजप सरकारमधील सत्तेत असणारे आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार झालेले आहेत. या दोन्हीही खासदार आमदारांनी या राष्ट्रीय महामार्गावरील दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करून प्रवासी व वाहन चालकांच्या भावना लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचे वाहनचलकांचे म्हणणे आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार लिंपणगाव- काष्टी रेल्वे गेट दौंड अगर नगरकडून येणारी रेल्वे सुटल्यानंतर संबंधित रेल्वे गेट कर्मचारी तातडीने रेल्वे गेट बंद करतात. त्यामुळे या रेल्वे गेटवर काष्टी व श्रीगोंदाकडून येणारे वाहने लांबच्या लांब रांगा लागून थांबल्या जातात. त्यामध्ये काही रुग्णही असतात. प्रस्तुत महिलाही असतात. काही प्रवाशांना विवाह सोहळ्यासाठी रेल्वे गेट बंद असल्याने उपस्थित राहता येत नाही. अशा अनेक प्रसंगाला प्रवासी व वाहनचालकांना रेल्वे गेट बंदचा फटका बसतो. यासाठी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व श्रीगोंदाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी या महत्त्वाच्या रेल्वे गेटचा प्रश्न तातडीने प्रशासकीय पातळीवर माहिती घेऊन मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचे वाहन चालक व प्रवाशांचे म्हणणे आहे. या रेल्वेगेट वरील उड्डाणपुलासाठी वेळोवेळी प्रसिद्धीच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री खासदार आमदार यांचे वेळोवेळी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु या उड्डाणपुलांच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी सामूहिकपणे पाठपुरावा न केल्याने हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित असल्याचा भावना देखील वाहनचालकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
लिंपणगाव काष्टी रेल्वे गेटवर रेल्वे गेट बंद असल्याने रात्री अप रात्री अनेक वाहने थांबल्यामुळे यापूर्वी लुटमारीच्या देखील घटना घडलेले आहेत. तर वेगाने येणारे वाहने देखील एकमेकांवर धडकून अनेक प्रवासी व वाहन चालक मृत्युमुखी पावले आहेत. त्यामुळे रेल्वे गेटवर तातडीने उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता आहे. अशी मागणी वारंवार वाहनचलकांमधून व्यक्त केली जात आहे.
वाचक क्रमांक :