By : Polticalface Team ,17-12-2024
करमाळा प्रतिनिधी
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्यापासून सुरु झाल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.याबाबत सविस्तर बोलताना त्यांनी सांगितले की रब्बी पिकांसाठी डावा कालवा व चिलवडी शाखा यामधून आवर्तन सुरु झाले आसुन करमाळा तालुक्यात पाणी पोहचले आहे.
दि -18 ते 20 डिसेंबर वीट व झरे (सा. क्र. 240-235)
तसेच वीट सा. क्र. 235 ते 226
20 ते 21 रोजी दोन दिवस पाणी दिले जाणार आहे.
तर दि. 21 व 22 रोजी वजारवाडी,रावगाव,पिंपळवाडी (सा. क्र. 226 ते 223) पाणी दिले जाणार आहे.
दि. 22 ते 24 डिसेंबर दरम्यान सा. क्र. 223 मधून मोरवड, कोर्टी, विहाळ व पोंधवडी या भागात पाणी दिले जाईल.
तर चिलवडी शाखा कालव्याद्वारे चारी क्र. 26/500 ते 34/500 मधून कुंभारगाव येथे पाणी दिले जाईल.
दि. 22 व 23 डिसेंबर रोजी सावडी मधील 21/620 ते 26/500 यातील उपचाऱ्यांना पाणी दिले जाईल.
तर दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी चिलवडी शाखा कोर्टी वितरकेमधून सावडी, कोर्टी व राजुरी या ठिकाणी पाणी दिले जाईल
आशा नियोजनातून करमाळा तालुक्यातील कुकडी डावा कालवा प्रकल्पामध्ये लाभ क्षेत्रात पाणी पोहचवले जाईल अशी माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.
आमदार नारायण आबा पाटील यांनी या आवर्तनासाठी निवडणूक निकालापासूनच आपला पाठपुरावा चालू ठेवला होता.यासाठी त्यांनी उपविभागीय आभियंता यांनाही आवर्तन योग्य रीतीने देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर उपविभागीय अधिकारी स. र. जाधव यांनाही सदरचे आवर्तन हे महत्वाचे असण्याने कुकडी डावा कालवा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बारकाईने लक्ष देऊन व समक्ष कार्यस्थळी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व लाभ क्षेत्रातील तलावात पाणी पोहचवावे असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सूचित केले आहे. पाणी वहन कालावधी, पाण्याची उपलब्धता यानुसार सदरच्या नियोजनात नाम मात्र बदल होण्याची शक्यता असल्याचे समजते परंतु आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून रब्बी कालावधीतील उभ्या पिकांना पाणी देण्यात येणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.