लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे
By : Polticalface Team ,07-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या "लेखक - विद्यार्थी सवांद" कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार, लेखक व प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांचे प्रतिपादन श्रीगोंदा ( 3 जाने. 2025)
लेखक होणे कवी होणे साहित्यिक होणे ही नैसर्गिक देन असली तरी मात्र वाचनाने लिहिण्याची प्रेरणा मिळते, वाचनामुळे शब्द भंडार विकसित होते. असे मत प्रसिद्ध लेखक डॉ बाळासाहेब बळे यांनी व्यक्त केले. ते वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात लेखक वाचक परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. वाचन पंधरवडा निमित्त दि. 3 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजित केले होते. सुरुवातीला स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जी सूर्यवंशी होते.
विद्यार्थ्यांशी परिसंवाद साधताना डॉ. बळे म्हणाले की साहित्यिकही या समाजाचा एक घटक असतो. आणि तो साहित्यिक समाजाचे प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.समाजातून साहित्य व साहित्यातून समाज निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहते.
पुस्तक लेखनाविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक पुस्तकाचा संदर्भ देत बहिणाबाई चौधरी पासून ते वि स खांडेकर, इंदुमती जोंधळे, संत साहित्य इत्यादी लेखकांचा लेखन प्रवास सांगितला.
अध्यक्ष भाषणात डॉ. सतिषचंद्र सूर्यवंशी यांनी महाविद्यालयातील लेखकांचा परिचय करून देत लेखक आणि विद्यार्थ्यांनी मिळून वाचन संस्कृती जोपासावी असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. एस. काकडे यांनी केले तर उत्कृष्ट असे सूत्रसंचालन डॉ. सविता लोखंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. एम डी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुरेश रसाळ, प्रा. मिलिंद बेडसे डॉ. एम एस भोस ग्रंथपाल ईश्वर कणसे व त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कातोरे सर, वरिष्ठ विभागातील सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ कनिष्ठ सर्व अध्यापक अध्यापके तर सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमा बद्दल संस्थाध्यक्ष श्री राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, युवा नेते दीपक शेठ नागवडे, संस्था निरीक्षक सचिनराव लगड, सचिव प्रमोद शिंदे साहेब आदींनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी