राजेंद्र हिरवे यांनी सेवा कालावधीत संस्था व विद्यालयाचा नावलौकिक वाढवला- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे ,मुख्याध्यापक राजेंद्र हिरवे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

By : Polticalface Team ,26-01-2025

राजेंद्र हिरवे यांनी सेवा कालावधीत संस्था व विद्यालयाचा नावलौकिक वाढवला- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे ,मुख्याध्यापक राजेंद्र हिरवे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

लिंपणगाव (प्रतिनिधी) मुख्याध्यापक राजेंद्र हिरवे यांनी शिक्षण संस्थेत सेवा कालावधीत उत्कृष्ट ज्ञानदान करून संस्था व विद्यालयाचा नावलौकिक वाढवला. आपल्या प्रदीर्घ सेवेत शालेय विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षणाचे धडे दिले असे गौरवोद्गार सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 

        श्रीगोंदा तालुक्यातील डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र हिरवे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने श्री व सौ हिरवे यांचा साप्तनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते. 

       यावेळी व्यासपीठावर मा. पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे; भाऊसाहेब बरकडे; राजेंद्र म्हस्के; सरपंच सुरेखा हिरवे; सावता हिरवे; संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड; शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे; सरपंच सुरेखा हिरवे; उपसरपंच सारिका दानवे; कोळगावचे सरपंच भैय्या लगड; नितीन नलगे; एकनाथ बारगुजे; दीपक तारकुंडे; बाळासाहेब जगताप; शिवाजीराव जगताप; शिवदास शिंदे; यांच्यासह श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सर्व आजी माजी मुख्याध्यापक; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी; विद्यार्थी; ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        याप्रसंगी मा सभापती शहाजी हिरवे; ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र मडके; ह भ प नारायण झेंडे; विद्यार्थी प्रतिनिधी समीक्षा आल्हाट आदींनी मुख्याध्यापक हिरवे यांच्या कार्यकर्तृत्वावर स्तुतीसुमने वाहिली. 

      यावेळी प्रसिद्ध व्याख्याते अशोकराव देशमुख यांचे हसत खेळत तणाव मुक्ती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान प्रसंगी  देशमुख यांनी प्रबोधन करताना म्हटले आहे; प्रत्येकाने घरातील एकत्रित कुटुंबात आनंदी वातावरण ठेवावे; मनमोकळेपणा ठेवावा; अबोला नसावा; सुखी व्हायचे असेल तर दुःखात सहभागी व्हा; आत्ताची पिढी आळशी झालेली दिसून येत आहे. मुलांनी कष्टाची सवय ठेवावी; आजच्या स्थितीला मोबाईलच्या जास्त वापरामुळे तरुण पिढी बिघडली जात आहे; सुखी व्हायचे असेल तर मित्र जोडा; कल्पकतेने पैसे कमवा; दानशूरपणा ठेवावा; सेवानिवृत्तीनंतर तीर्थ क्षेत्राला जावे; व्यसनापासून दूर राहावे; अशा मौलिक सूचना देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना दिल्या. 

      सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक राजेंद्र यावेळी म्हणाले की शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंच्या कृपाशीर्वादाने शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली नोकरी करत असताना आपण कुटुंबापेक्षा विद्यार्थ्यांवर अधिक प्रेम ठेवले. उद्याची उत्तम भावी पिढी घडविण्यासाठी प्रामाणिकपणे ज्ञानदान केल्याचे हिरवे यांनी सांगून सन्मान केल्याबद्दल शिक्षण संस्था व विद्यालयाचे आभार मानले. 

       अध्यक्ष स्थानावरून बोलताना नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की; सहकार महर्षी बापूंनी ग्रामीण भागातील मुलांच्या ज्ञानात वाढ व्हावी उत्तम संस्कार घडावेत म्हणून खेडोपाडी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय केली. त्यामुळे अनेक गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाबरोबर नोकऱ्या देखील मिळाल्या. त्याचे उत्तम उदाहरण राजेंद्र हिरवे सर हे आहेत. शिक्षण संस्थेत नोकरी करताना हिरवे यांनी अतिशय कष्टमय जीवनातून प्रामाणिक ज्ञानदान केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाला दिशा मिळाली. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की; शालेय शिक्षण घेताना आई-वडिलांपेक्षाही शिक्षक हे जबाबदारीने विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. जीवनात कोणताही प्रसंग आला तर प्रथम शिक्षकाची आठवण येते. अलीकडे शिक्षण पद्धत बदलताना दिसते. त्यामध्ये तरुण पिढी मोबाईलच्या युगामध्ये गुंतल्याने  विद्यार्थी जीवनावर मोठा दुष्परिणाम होताना दिसून येत आहे. सततच्या मोबाईल वापरामुळे जीवनाची दिशा अत्यंत बिकट होणार आहे. तेव्हा मोबाईल पासून दूर राहावे; असे सांगून राजेंद्र हिरवे यांना सेवानिवृत्तीनंतरचे पुढील दीर्घायुष्यासाठी श्री नागवडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

   प्रस्ताविक ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र मडके यांनी केले. सूत्रसंचालन माध्यमिक सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अशोकराव आळेकर यांनी केले. आभार पर्यवेक्षक नवनाथ पवार यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी