दीर्घायुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने चांगले विचार व गुरुने दिलेल्या संस्काराची सांगड घालावी मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे

By : Polticalface Team ,13-04-2025

दीर्घायुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने चांगले विचार व गुरुने दिलेल्या संस्काराची सांगड घालावी  मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे

लिंपणगाव (प्रतिनिधी) जीवन जगत असताना खूप काही विचार करावा. परंतु दीर्घायुष्य जगण्यासाठी गुरुंनी दिलेल्या संस्कार व विचाराची सांगड घालावी निश्चितपणे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही; असे प्रतिपादन मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.

      श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या सन २०१२-१३ या एसएससी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे हे होते. मेळाव्याच्या प्रारंभी ज्यांनी ज्ञानदान करून जीवनाला दिशा दिली; संस्काराचे व ज्ञानाचे धडे दिले अशा गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांनी स्वागत करून सन्मानित केले.

     या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य ए एल पुराणे मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे; मा प्राचार्य आदिनाथ पाचपुते; प्रा पुष्पलता पाचपुते, मुख्याध्यापक बाळासाहेब जठार; रवींद्र झुंजार; एम पी खेडकर; बाळासाहेब मांडे; शिवाजी इथापे; प्रा. निसार शेख; श्रीमती नौशाद शेख; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; एकनाथ नेटवटे आदी आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       याप्रसंगी मा विद्यार्थी ज्ञानदेव नगरे; राहुल काकडे; पूनम खोमणे; सुभाष गरुड आदींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.    

      याप्रसंगी माजी विद्यार्थी शुभम काकडे यावेळी बोलताना म्हणाले की; शालेय जीवनात शिक्षकांकडून आम्हाला उत्तम प्रकारे शिक्षण; संस्कार; शिस्त अंगी मिळाली. त्यांच्यामुळेच आमच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. आता आम्ही विविध क्षेत्रात उच्च पदावर सेवेत आहोत. हे केवळ गुरु व आई-वडिलांच्या कृपेमुळेच आमचे करिअर घडल्याचे आवर्जून सांगितले. 

     यावेळी ज्येष्ठ शिक्षक शिवाजी इथापे म्हणाले की; विद्यार्थी आनंदी दिसला की; आमच्याही चेहऱ्यावर आनंद द्विगुणित होतो. उज्वल भविष्यासाठी आयुष्यामध्ये मार्गस्थ होत असताना प्रत्येकाने जिद्द ठेवावी. त्यामध्ये आई-वडील व शिक्षकांना मात्र जीवनात विसरता कामा नये असा सल्ला दिला. 

      यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जठार आपल्या शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की; शालेय जीवनात माध्यमिक स्तरावरील जीवन कधीही विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. 13 वर्षांपूर्वीची विद्यार्थी गाळाभेट विद्यार्थ्यांनी घडून आणली. हा एक दुग्ध शर्करा योग आहे. माजी विद्यार्थ्यांनी गुरु शिष्याची गळाभेट घडवून आणल्यामुळे आम्हालाही ऊर्जा प्राप्त झाली. पुढील दीर्घायुष्यामध्ये वाटचाल करताना नियत; विचार व कुटुंबातील संस्कार प्रत्येकाने जतन करावेत. असे सांगून श्री जठार यांनी माजी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. 

     मा प्राचार्य आदिनाथ पाचपुते यावेळी म्हणाले की; आत्ताची शिक्षण पद्धती ही तकलादू आहे. पूर्वीची शिक्षण पद्धत आणि आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये  आमुलाग्रह बदल झालेला दिसतो. विद्यार्थ्यांनी जीवनात जे क्षेत्र निवडले. त्या क्षेत्राशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला श्री पाचपुते यांनी यावेळी दिला. 

       अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य बाळासाहेब शेंडे यावेळी म्हणाले की; प्रत्येकाने स्वतःचे करिअर घडवण्यासाठी चांगले मित्र व संस्कारावर आपले करिअर अवलंबून असते. त्यासाठी अलीकडे चांगले मित्र आवश्यक आहेत. धार्मिक क्षेत्रातून देखील आपले चांगले संस्कार घडतात. जीवन हे क्षणभंगुर आहे. वामनराव पै यांच्या सल्ल्यानुसार तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार यानुसार आपण आपल्या आयुष्याची योग्य दिशा व वाटचाल करावी असे सांगून माजी विद्यार्थ्यांना शेंडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

        स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी इरफान तांबोळी; शुभम लाटे; मयूर जगताप; सय्यद सद्दाम; संदीप क्षीरसागर; भरत कांबळे आदींसह माजी विद्यार्थ्यांनी मोठे परिश्रम घेतले. 

      सूत्रसंचालन पूनम खोमणे व अभिजीत जठार यांनी केले. तर आभार अक्षय गायकवाड यांनी मानले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष