By : Polticalface Team ,14-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय घोगरगाव ता. श्रीगोंदा येथील सन २००७-२००९ च्या ज्यु.काॅलेज बॅचचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास शाळेचे माजी प्राचार्य तथा रयत कौन्सिलचे सदस्य श्री.कन्हेरकर सर समवेत त्या काळातील प्राध्यापक भगत सर, माजी प्राचार्य अविनाश गांगर्डे सर, मा.प्राचार्या रजनी गांगर्डे मॅडम, हिराबाई खंडागळे मॅडम, व ज्ञानेश्वर गांगर्डे सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक नरवडे सर ,जाधव सर उपस्थित होते.
सर्व माजी विद्यार्थी बंधूभगिनी रोजचा व्याप सोडून उपस्थित राहून या कार्यक्रमास रंगत आणली होती.
प्रसंगी
अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी मा.प्राचार्य कन्हेरकर सर म्हणाले, की आपला पैसा व आनंद या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात. आनंद उपभोगण्यासाठी पैसा लागतोच असे नाही तर तो आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. पण इच्छाशक्ती ने होत असलेल्या या आगळ्यावेगळ्या संयोजन, आयोजनाचे कौतुक करत या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचा वारसा जोपासला असून असेच स्नेहमेळावे होत राहिले तर नव्या जुन्या आठवणी ,आचार विचाराची अदान प्रदान आणि आपल्या गुरु आणि गुरुकुलाचे ऋणानुबंध कायम राहतील या शब्दात स्मृतीसुमने उधळली.
या कार्यक्रमास तरटेवाडी जिल्हा परिषद शाळेचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कवी श्री. अक्षय पवार आवर्जुन उपस्थित होते.त्यांनी उपस्थित शिक्षकांना स्वतःचा काव्यसंग्रह सप्रेम भेट दिला.
यावेळी बोलताना प्रत्येकाने मी तेव्हा कसा व आता कसा हे विस्तृतपणे सांगीतले आणि सर्वांनुमते शाळेच्या ग्रंथालयासाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्याचे ठरविले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी विद्या डोके ,जयश्री उगले, शितल बेरड, कोहक वंदना, पूनम लुनिया, अश्विनी शेळके, जयश्री पठारे, वंदना तरटे, दिपाली लुनिया, जाहिरा शेख, डोके संध्या, उज्वला कोरडे, गौतम गारुडकर, अंबादास गारुडकर, किरण पठारे, निलेश पठारे, अतुल बाबर, किशोर गुंजाळ, सोमनाथ क्षीरसागर, गणेश शेळके, किरण उगले, विकास वाळके, बाबासाहेब तरटे, ज्ञानेश्वर विटकर आदि माजी विद्यार्थी तसेच अनिल जगताप सर, बापू भगत, विक्रम पठारे, कर्मचारी भाऊसाहेब भुजबळ उपस्थित होते.
सदर स्नेहमेळावा आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला.हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी विशेष परिश्रम किशोर गुंजाळ, शितल गुंजाळ,अतुल बाबर व उज्वला उल्हारे यांनी घेतले. यावेळी महिलाभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब तरटे, सूत्रसंचालन अतुल बाबर व उज्वला उल्हारे यांनी केले, सर्वांचे आभार जाहिरा शेख यांनी मानले.
वाचक क्रमांक :