सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
By : Polticalface Team ,27-05-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये सात सेवकांचा सेवानिवृत्तीचा समारंभ,अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका व अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ अनुराधावहिनी नागवडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळेस त्या बोलत होत्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष श्री बाबासाहेब भोस होते,
आपले मनोगत व्यक्त करताना वहिनी म्हणाल्या, बापूंच्या विचारांचा वसा आणी वारसा सर्वच सेवकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला त्यामुळेच तालुक्यात सुजाण पिढी निर्माण झाली, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला सुसंस्कृत वळणवाट देण्याचा प्रयत्न हि ह्या सेवकांनी केला असे सांगितले, शिकवण्याचे प्रामाणिक काम तर यांनी केलेच, पण बापूंच्या विचाराला कधीही तिलांजली ह्या सेवकांनी दिली नाही महाविद्यालय आदर्श बनविण्यासाठी ह्या सेवकांनी काबाडकष्ट केले, ह्यांच्या सेवानिवृत्तीमुळे महाविद्यालतात पोकळी निर्माण होईल परंतु संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रदादा नागवडे ती पोकळी भरून काढतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला व त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संस्था ऋण व्यक्त करीत आहे, असे ही त्या. मनोगतात म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले, त्यात ते म्हणाले की , ज्या सहकाऱ्यांसमवेत मी काम केले ते सुरवातीला एक सहकारी म्हणून व नंतर प्राचार्य म्हणूनही प्रत्येकवेळेस त्या सर्व सहकार्यांनी आपले काम प्रामाणिक केल्याचेही सांगितले व ह्या सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्त करून बापूंचा विश्वासही ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मिळवला होता असे सांगितले व त्यांच्या ज्ञानाचा फायदा महाविद्यालयाला इथून पुढच्या काळातही व्हावा व त्यासाठी आपण योगदान द्यावे हा आशावादही व्यक्त केला,
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्कार मूर्तींचेही मनोगत झाले त्यामध्ये प्रा सुनंदा मोरे मॅडम यांनी बापूंची आठवण काढत असताना माझ्यावर मुलीसारखे प्रेम त्यांनी केले व मी नागवडे कुटुंबाचीच एक सदस्य आहे याची जाणीव मला पदोपदी जाणवली त्यानिमित्त नागवडे कुटुंबाचे ऋण व्यक्त केले
तसेच सेवानिवृत्त उपप्राचार्य श्री भगवान सोनवणे यांनी, त्याकाळची खडतर परिस्थिती, बापूंची आठवण काढताना त्यांनी बोट धरून मला विद्यार्थी म्हणून महाविद्यालयामध्ये आणले व त्याच महाविद्यालयाचा उपप्राचार्य पदावर नियुक्त केले त्याबाबत बापूंची कृतज्ञता व्यक्त केली, बापूंचे आचार विचार त्यांची पुढची पिढी अंमलात आणतेय त्यामुळे नागवडे कुटुंबाचे भविष्य उज्वल असल्याचे सांगितले, व शेवटच्या श्वासापर्यंत नागवडे कुटुंबाचाच मी पाईक राहील अशी ग्वाही दिली
अध्यक्षीय मनोगतात श्री बाबासाहेब भोस यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास सांगितला व अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही हे महाविद्यालय तग धरून राहिले त्याचे कारण बापूंची समर्पित वृत्ती , राजेंद्रदादा नागवडे यांचे प्रशासन व ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे योगदान आहे हे सांगितले, व जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्या अनुभवाचा फायदा महाविद्यालयासाठी व्हावा हा आशावाद व्यक्त केला
कार्यक्रमासाठी नागवडे कारखान्याचे संचालक विश्वनाथदादा गिरमकर, लक्ष्मणअण्णा रायकर, मारुतीमामा पाचपुते, विठ्ठलनाना जंगले, प्रा सुरेश रसाळ उपस्थित होते तसेच माजी संचालिका सुरेखाताई लकडे, लगडताई उपस्थित होत्या, महाविद्यालयाचे सेवानिवृत्त सेवक,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आभार प्रा सुरेश रसाळ यांनी व्यक्त केले व निवेदन प्रा शंकर गवते यांनी केले
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद
टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड
नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.
तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना
शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा
अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.
शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड
शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू