By : Polticalface Team ,14-06-2025
                           
              
  नंदकुमार कुरुमकर  लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात मृग नक्षत्राचा दररोज जोरदार पाऊस बरसत असल्याने खरीप हंगामाच्या पेरणीला पावसामुळे मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान 7 जून पासून मृग नक्षत्राच्या पावसात प्रारंभ झाला आहे. सात जून पासून सतत पाऊस बरसत असल्याने खरीप हंगामाच्या अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामध्ये कपाशी च्या लागवडी केल्या; परंतु सततच्या पावसाने सरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले गेले आहे. त्यामध्ये उगवण झालेली कपाशी व बाजरी पिके अक्षरशः पाण्यात असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे दुबार पेरणीचे संकट ओढवले गेल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान शनिवारी दुपारी सुरू झालेला पाऊस रात्रभर बरसल्यामुळे शनिवारी 13 जून रोजी लिंपणगावचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिंपणगावकरांना अंधारातच रात्र काढावी लागली. गेल्या आठ दिवसापासून मेघगर्जनेसह दररोज पाऊस पडत असल्याने सर्वत्र ओढे; नाले; बंधारे; विहिरी व कुपनलिका तुडुंब वाहताना दिसत आहेत. दरम्यान दररोज ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होत नाही. त्यामुळे जमिनीतील वापसा देखील होण्यास उशीर होत आहे. पाऊस वेळेत पडला; परंतु पाऊस काही विश्रांती घ्यायला तयार नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरण्या अक्षरशः खोळंबल्या आहेत. ज्या निचऱ्याच्या जमिनी आहेत. तिथे मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी; बाजरी; मका; उडीद; सोयाबीन इत्यादी पिकांची पेरणी व लागवडी केल्या आहेत. मात्र जिथे निचऱ्याच्या जमिनीचा वापसा होत नाही. तिथे मात्र सततच्या पावसामुळे पेरणीला मोठा विलंब होत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. 
           रोहिणी नक्षत्राच्या प्रारंभी वेळेत पाऊस पडला. उन्हाची तीव्रता देखील त्यावेळी कमी झाली. गारवा वाढला. पाणीटंचाई काही अंशी शिथिल झाली. शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या. परंतु रोहिणी नक्षत्रापासून मृग नक्षत्राच्या मध्यावर पाऊस काही थांबायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल; त्या किमतीत खरेदी केलेले खरीप हंगामाची बियाणे अनुक्रमे कपाशी; बाजरी; मूग; उडीद; सोयाबीन इत्यादींच्या पेरण्या केल्या उगवण झाली; परंतु पावसाचे पाणी मात्र जमिनीतून हटायला तयार नाहीत. त्यामुळे पाऊस जर असाच कायम राहिला तर शेतकऱ्यां समोर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षी सततच्या पावसामुळे खरीप हंगामावर टांगती तलवार असल्याचे शेतकरी सांगतात. 
        दरम्यान  शनिवारी दुपारी 12 वाजता ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी बरसल्या. मात्र काही क्षणातच पाऊस पुन्हा गायब झाला ऊन व उकाडा देखील वाढला. मृग नक्षत्रात दररोज पाऊस पडत असल्यामुळे शेती उद्योगाची कामे मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची बी- बियाणे खरेदी केली. परंतु पाऊस काही थांबायला तयार नाही. त्यामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडत आहे. याची चिंता मात्र शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षाचा उन्हाळी हंगाम अत्यंत थरारत गेला. उन्हाळी हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना श्रीगोंदा तालुक्यात घोड लाभक्षेत्र वगळता सर्वत्र जलसाठा संपुष्टात आला होता. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न अतिशय गंभीर बनला गेला. त्यामध्ये कुकडी लाभ क्षेत्रात पाण्याचा मोठा उन्हाळी हंगामात अगडोंब निर्माण झाला. कुकडीचे आवर्तन सोडले. परंतु पावसाचा अंदाज आल्यानंतर कुकडीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी  कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले. असा आरोप देखील कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून जलसंपदा विभागावर करण्यात येत होता. आवर्तन सोडले. परंतु प्रत्येक तालुक्याला तुटपुंजा कालावधी देण्यात आला. तिथे देखील पाणी वाटपात कात्री मारली. कुकडीचे करमाळ्याला आवर्तन पोहोचले. आणि अवकाळीने श्रीगोंदा तालुक्यासह अनेक तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. संकटकाळात मेघराजा आमच्यासाठी धावून आला. त्यामुळे आमचे उन्हाळी हंगामातील पिके व पाणी प्रश्न शिथिल झाला. अशा भावना देखील कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष