राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काम पूर्ण होण्यासाठी याचिका दाखल
                      
                
            
               By : Polticalface Team ,Thu Feb 03 2022 09:53:16 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              पाथर्डी प्रतिनिधी:
 कल्याण- अहमदनगर- पाथर्डी- नांदेड- निर्मल रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा गेली सहा वर्षापासून नूतनीकरणाच्या कामासाठी प्रलंबित असून गेली सहा वर्षापासून सदरील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्यामुळे ५० किलोमीटरच्या टप्प्या मधील महामार्गावर अनेक स्वरूपाचे वाहन अपघात झाले असून, यामध्ये अनेक प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ते मुकुंद भास्कर गर्जे यांनी माहिती अधिकारा अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग कामा संदर्भात माहिती जमवून रखडलेले काम तात्काळ व्हावे, यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने केली होती. प्रशासनाने निवेदनाची वेळीच दखल न घेतल्यामुळे मुकुंद गर्जे यांनी पंतप्रधान कार्यालय तसेच राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली मा.नितीन गडकरी यांच्याकडे देखील या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय महामार्ग कार्यालय अहमदनगर तसेच मुंबई यांना सदर रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ मार्गी लावण्या संदर्भात पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. परंतु सदरील पत्र व्यवहाराला अनेक महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही, म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी यासंदर्भात आवश्यक ती माहिती मागवून संविधानिक मार्गाचा अवलंब करत, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, औरंगाबाद येथे सदरील रखडलेल्या महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, यासाठी जनहित याचिका दाखल केली असून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही.गंगापूरवाला तसेच एस. जी. दिघे यांनी २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राष्ट्रीय महामार्ग विभाग नवी दिल्ली, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन मुंबई, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग नाशिक, अधिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग पुणे, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी, उपविभागीय अधिकारी पाथर्डी, जिल्हाधिकारी अहमदनगर, मुख्याधिकारी नगरपरिषद पाथर्डी, तहसीलदार पाथर्डी तसेच ठेकेदार इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन पुणे यांना याचिकेवरील म्हणणे सादर करण्यासंदर्भात नोटीस काढली असून, म्हणणे सादर करण्यासाठी २४ मार्च पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ नूतनीकरण करतांना ६ वर्षे उलटूनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अपेक्षित कुठलीही सुधारणा झाली नाही. या कामासाठी करंजी घाट ते फुंदेटाकळी या दरम्यानच्या महामार्गालगत असलेल्या हजारो झाडांची तोड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज अर्धवट असतांना देखील बडेवाडी शिवारात टोल नाका उभारून स्थानिकाकडून टोल वसुली सुरू आहे. या व अशा अनेक मुद्द्याबाबत याचिकेमध्ये चर्चा करण्यात आलेली असून पाथर्डी तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग रखडल्यामुळे परिसरातील मोहटादेवी, भगवानगड,मढी,वृद्धेश्वर,शिराळ चिचोंडी,शिर्डी,शनीशिंगणापूर अशा देवस्थानाला जाणार्या भाविकांना देखील दैनंदिन अपघाताला सामोरे जावे लागत असून, परिसरातील पर्यटन  व उद्योग धंदे धोक्यात आल्याचे याचिकेत उल्लेखित करण्यात आले आहे. याचिकेमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची तसेच चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली टोल आकारणी बंद करण्याची तसेच रखडलेल्या कामामुळे झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाश्यांच्या मृत्यूस जबाबदार व्यवस्थे विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षापासून जाणीवपूर्वक राष्ट्रीय महामार्गाचे कामकाज रखडत ठेवल्या बाबत जबाबदार यंत्रणेविरुद्ध कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे .जनहित याचिका करता मुकुंद भास्करराव गर्जे यांच्यातर्फे अॅड.अनिरुद्ध निंबाळकर हे काम पहात असून त्यांना अॅड. रतन आढे व अॅड.हरिहर गर्जे हे सहाय्य करत आहेत.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष