19 मार्चला किसानपुत्रांचा उपवास - अमर हबीब

By : Polticalface Team ,Sat Feb 05 2022 21:02:56 GMT+0530 (India Standard Time)

19 मार्चला किसानपुत्रांचा उपवास - अमर हबीब यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने 19 मार्च 1986 रोजी सामूहिक आत्महत्या केली होती. त्या आधीही शेतकऱयांच्या आत्महत्या होत आल्या आहेत. पण अलीकडच्या काळातील नोंद झालेली ही भीषण आत्महत्या आहे. सरकारी आकडेवारी नुसार भारतात सुमारे पाच लाख शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून हे सरकारने जाणीवपूर्वक केलेले नरसंहार आहे. कारण या आत्महत्यांचे मूळ कारण सीलिंग, आवश्यक वस्तू व अधिग्रहण हे कायदे आहेत. हे कायदे सरकारने केले. पक्ष बदलले तरी हे कायदे रद्द झाले नाहीत. म्हणून शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी सर्व सत्ताधाऱयांची आहे. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे व शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे तात्काळ रद्द करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे! 19 मार्च या दिवशी देश-विदेशातील लाखो लोक उपवास/अन्नत्याग/उपोषण करतात. - हा उपवास देवाधर्माचा नाही. - हा उपवास कर्मकांड नाही. - हा उपवास राजकारण नाही. - हा उपवास भीक मागण्यासाठी देखील नाही. हा उपवास एक सहवेदना आहे. संकल्पाचा निर्धार आहे! 19 मार्च रोजी प्रत्येक किसानपुत्राने (शेतकऱयांच्या मुला मुलींनी) एक दिवस उपवास करावा. अन्नदात्यासाठी अन्नत्याग करावा. असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे. --- 19 मार्च रोजी मी (अमर हबीब) आंबाजोगाई येथे उपवास करणार आहे. 19 मार्च रोजी मुकुंदराज सभागृहात किसानपुत्रांचा मेळावा होणार आहे. हा मेळावा दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. उपोषणाची सांगता 5.30 वाजता सरबताने होईल. त्या नंतर सर्वांना खिचडीचे भोजन दिले जाणार आहे. --- 19 मार्चच्या निमित्ताने पानगाव येथील रमेश मुगे स्मारकापासून पदयात्रा निघणार आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुमारे 50 किसानपुत्र सहभागी होणार आहेत. या शिवाय अनेक स्थानिक लोक सहभागी होणार आहेत. घाटनांदूर, पूस, गिरवली, पिंपळा मार्गे पदयात्रा आंबाजोगाईला पोचणार आहे. या पदयात्रेत डॉ राजीव बसरगेकर, सुभाष कच्छवे, रामकृष्ण रुद्राक्ष, कालिदास आपेट आदी सहभागी होणार आहेत. अमर हबीब, 8411909909 किसानपुत्र आंदोलन
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी