19 मार्चला किसानपुत्रांचा उपवास - अमर हबीब

By : Polticalface Team ,Sat Feb 05 2022 21:02:56 GMT+0530 (India Standard Time)

19 मार्चला किसानपुत्रांचा उपवास - अमर हबीब यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने 19 मार्च 1986 रोजी सामूहिक आत्महत्या केली होती. त्या आधीही शेतकऱयांच्या आत्महत्या होत आल्या आहेत. पण अलीकडच्या काळातील नोंद झालेली ही भीषण आत्महत्या आहे. सरकारी आकडेवारी नुसार भारतात सुमारे पाच लाख शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून हे सरकारने जाणीवपूर्वक केलेले नरसंहार आहे. कारण या आत्महत्यांचे मूळ कारण सीलिंग, आवश्यक वस्तू व अधिग्रहण हे कायदे आहेत. हे कायदे सरकारने केले. पक्ष बदलले तरी हे कायदे रद्द झाले नाहीत. म्हणून शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी सर्व सत्ताधाऱयांची आहे. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे व शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे तात्काळ रद्द करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे! 19 मार्च या दिवशी देश-विदेशातील लाखो लोक उपवास/अन्नत्याग/उपोषण करतात. - हा उपवास देवाधर्माचा नाही. - हा उपवास कर्मकांड नाही. - हा उपवास राजकारण नाही. - हा उपवास भीक मागण्यासाठी देखील नाही. हा उपवास एक सहवेदना आहे. संकल्पाचा निर्धार आहे! 19 मार्च रोजी प्रत्येक किसानपुत्राने (शेतकऱयांच्या मुला मुलींनी) एक दिवस उपवास करावा. अन्नदात्यासाठी अन्नत्याग करावा. असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे. --- 19 मार्च रोजी मी (अमर हबीब) आंबाजोगाई येथे उपवास करणार आहे. 19 मार्च रोजी मुकुंदराज सभागृहात किसानपुत्रांचा मेळावा होणार आहे. हा मेळावा दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. उपोषणाची सांगता 5.30 वाजता सरबताने होईल. त्या नंतर सर्वांना खिचडीचे भोजन दिले जाणार आहे. --- 19 मार्चच्या निमित्ताने पानगाव येथील रमेश मुगे स्मारकापासून पदयात्रा निघणार आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुमारे 50 किसानपुत्र सहभागी होणार आहेत. या शिवाय अनेक स्थानिक लोक सहभागी होणार आहेत. घाटनांदूर, पूस, गिरवली, पिंपळा मार्गे पदयात्रा आंबाजोगाईला पोचणार आहे. या पदयात्रेत डॉ राजीव बसरगेकर, सुभाष कच्छवे, रामकृष्ण रुद्राक्ष, कालिदास आपेट आदी सहभागी होणार आहेत. अमर हबीब, 8411909909 किसानपुत्र आंदोलन
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष