अक्कलकोट तालुक्यातील आगामी स्थानिक निवडणूकांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात संधी द्यावी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जाधव यांची मागणी
By : Polticalface Team ,Sat Feb 05 2022 21:05:12 GMT+0530 (India Standard Time)
अक्कलकोट /महेश गायकवाड
अक्कलकोट तालुक्यातील होणाऱ्या आगामी नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये महिलांना मान सन्मान दिल्या शिवाय पर्याय नाही त्यासाठी पक्षाने मोठ्या प्रमाणावर महिलांना तिकीट द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अक्कलकोट महिला आघाडी तालुका अध्यक्षा माया ताई जाधव यांनी केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा झेंडा तालुका महिला आघाडी अध्यक्ष म्हणून फडकविण्यास आपण सज्ज झालो आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुका महिला आघाडी चे अध्यक्ष पद स्वीकारले पासून मायाताई जाधव सर्व जिल्हा परिषद गट नगरपालिका, वाडया वस्ती पिजुन काढल्या आहेत आणि येत्या नगरपरिषद असो किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका मध्ये अककलकोट तालुकयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची ताकद दाखवून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे आणि तालुक्यात आपण च किगमेकर ची भूमिका निभावणार आहोत असेही त्यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अक्कलकोट महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ताई जाधव यांनी तालुक्यात पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत काम सुरू केले आहेत, कोणतेही शासकिय काम असो महिला वरील अन्याय अत्याचार असो किवा अन्य कोणत्या प्रकारचे काम असो त्या तातडीने सोडवतात आणि जनतेच्या मदतीला धावून जात असतात ही त्यांची जमेची बाजू आहे.
तालुक्यात कोरोना काळात आरोग्य तपासणी शिबीर तसेच कोरोना काळात गोरगरिबांना किराणा मालाच्या किटचे वाटप आणि जवळपास 1200 ते 1500 महिलांना प्रशस्तीपत्र देऊन केलेला सन्मान व सत्कार या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. अक्कलकोट तालुक्यात काम करत असताना आपल्याला जाणवले की आपण स्वतः घराबाहेर पडल्या शिवाय आपल्या ला कोणी मान सन्मान देत नाही म्हणून आपण पदर खोचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या माध्यमातून अककलकोट तालुकयातील येणारा आमदार कोणाला करायचे हे आम्ही आपण महिला भगिनी ठरवु शकतो असेही त्यांनी सांगितले.
अक्कलकोट मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा आमदार विधानभवनात पाठविल्या शिवाय आपण गप्प बसणार नाही अशी सिंह गर्जना ही मायाताई जाधव यांनी केले आहे,अक्कलकोट तालुक्यात मायाताई जाधव यांच्या रुपाने वेगळी ओळख निर्माण झाली असून तालुक्यात त्यांचा खुप मोठा जनसंपर्क वाढला आहे, हे देखील नाकारून चालणार नाही
वाचक क्रमांक :