घोड डाव्या कालव्याचे आवर्तन लवकरात लवकर सुरु करावे- आ.बबनराव पाचपुते
By : Polticalface Team ,Fri Feb 25 2022 17:56:12 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी:- घोड डावा कालवा लाभक्षेत्रामध्ये सध्या पाण्याची नितांत आवश्यकता असून घोड लाभक्षेत्रा खालील शेतकऱ्यांची चालू पिकांसाठी पाणी लवकरात लवकर मिळावे अशी मागणी होत आहे. घोड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उभी पिके जळून जाण्याची भीती शेतकऱ्यामधे निर्माण झाली असल्यामुळे लाभक्षेत्रातील रब्बी हंगामातील पिकांकरिता कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत लाभधारकांकडून मागणी होत आहे.
तरी घोड प्रकल्पाच्या कालव्याद्वारे खरीप हंगामातील प्रथम आवर्तन १ मार्च २०२२ पासून सुरु करून लाभधारक शेतकर्यांना त्यांच्या शेतीसाठी त्यांचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी आमदार अशोकबापू पवार व आमदार रोहितदादा पवार यांच्याशी चर्चा करून अधिक्षक अभियंता सांगळे साहेब व मुख्य अभियंता धुमाळ साहेब यांची भेट घेवून लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सुचविले. घोड डाव्या कालवा आवर्तनाबाबत आ. अशोकबापू पवार व आ. रोहितदादा पवार यांच्याशी झालेल्या सकरात्मक चर्चेतून अधिक्षक अभियंता, पुणे यांच्याशी चर्चा करून पाणी १ मार्च २०२२ च्या दरम्यान सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आ. बबनराव पाचपुते यांनी वार्ताहराशी बोलताना दिली.
वाचक क्रमांक :