सह्याद्री-देवराई वनविभागात महिनाभरात दुस-यांदा आग; वनविभागीय आधिका-यांना घटनेचे गांभीर्य नाही ,प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर यांना तक्रार

By : Polticalface Team ,Thu Mar 10 2022 21:50:26 GMT+0530 (India Standard Time)

सह्याद्री-देवराई वनविभागात महिनाभरात दुस-यांदा आग; वनविभागीय आधिका-यांना घटनेचे गांभीर्य नाही ,प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर यांना तक्रार बीड: जिल्ह्य़ातील वनविभागातील आधिका-यांना शासन कोट्यावधी रूपये वनविभागातील विविध कामावर खर्च करत असताना त्यात कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करत असतानाच वनविभागातील ऊरल्यासुरल्या झाडांचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडता येत नसुन सह्याद्री-देवराई परीसरात महिनाभरातच दुस-यांदा आग लागल्यामुळे कर्तव्यावर कसुर केल्याबद्दल वनविभागातील आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)कार्यालय नागपुर यांना केली आहे. महिनाभरातच सह्याद्री-देवराई वनविभागात दुस-यांदा आग सह्याद्री-देवराई परीसरात दि.१३ फेब्रुवारी रोजी आगीत झाडांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले अहतानाच महिना पुर्ण होण्याच्या आतच दि.९ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता वनपरिक्षेत्र, वनमंडळ बीड, नियतक्षेत्र पालवण, फाॅ.सव्हे नंबर ३७९ गावाचे नाव गौळवाडी (पा )कं.नं.३७८ रोपवनक्षेत्र २५ हेक्टर भाग-१,रोपनवर्षे २०१८-१९(एमपीडब्लु),२०१९-२० (एफवायओ) परीसरात आग लागली असुन अंदाजे १० एकरक्षेत्रातील ४०००-५००० झाडांचे जळुन नुकसान झाल्याचे बोलले जाते.. आग लागल्याची कल्पना देऊन सुद्धा वनविभागातील आधिकारी आलेच नाहीत,कामच करत नाहीत :-सुभाष मस्के आग लागली, ग्रामस्थांनी आग विझवली परंतु वनविभागातील आधिका-यांना फोनवरून कल्पना देऊन सुद्धा कोणीही आले नाही, कर्मचारी आधिकारी इकडे फिरकत नसल्याची तक्रार ग्रमस्थांनी केली असून वनविभागातील कर्मचा-यांना याचे गांभीर्य नसल्याची संतप्त प्रतिक्रीया दिली आहे आग विझवताना पंडीत साबळे, राहुल साबळे, किशोर काळे, वैभव काळे, वसंत काळे, बंडु शेंडगे, राजेंद्र गाडे, लक्ष्मण जाधव, मनोज भडंगळे, सतिश कळसाने, रामभाऊ पवार, सागर मस्के,भागवत मस्के, सुभाष मस्के आदि हजर होते. प्रधान सचिव महसुल व वनविभाग, मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर, विभागीय आयुक्तांना तक्रार वनविभागातील आधिका-यांवर जिल्हाप्रशासनाचा अंकुश नसुन जिल्हाधिका-यांनी १० वेळा वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात तक्रार, आंदोलनानंतर चौकशी अहवाल मागितल्यानंतर एकदाही अहवाल दिला नसल्याचे माहीती आधिकारात उघड झाले असून कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन वनविभागातील आधिका-यांनी संगनमतानेच कोरोना कालावधीत १० कोटी ८४ लाख रूपयांचा अपहार केला असून तक्रारीनंतर चौकशी व कारवाईच्या भितीने बेकायदेशीररीत्या पोकलेन, जेसीबी यंत्राच्या सहाय्याने राखीव वनविभागात कामे करणे तसेच वारंवार वनविभागात आगीच्या घटना संशयास्पद असुन संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)कार्यालय नागपुर,विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी