शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती; नरभक्षी कायदे रद्द करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन
By : Polticalface Team ,Sun Mar 20 2022 09:20:08 GMT+0530 (India Standard Time)
बीड(प्रतिनिधि):
शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असुन स्मृतीशेष साहेबराव करपे कुटुंबियांच्या सामुहिक आत्महत्येच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करत शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग),आवश्यक वस्तु, जमिन अधिग्रहण आदि नरभक्षी कायदे रद्द करण्यात यावेत व शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१९ मार्च २०२२ वार शनिवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल देशपांडे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन बीडकर, शेख मुबीन बीडकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे,बलभीम उबाळे आदि. सहभागी आहेत.
सविस्तर माहीतीस्तव
___
१९ मार्च १९८६ रोजी या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली ज्याची शासन दरबारी अधिकृत नोंद आहे ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्य़ातील चिलगव्हाण या गावातील सामाजिक व संतविचारांचे शेतकरी स्मृतीशेष साहेबराव करपे पाटील यांनी त्या दिवशी आपली पत्नी व ४ लेकरांसह वर्धा जिल्ह्य़ातील दत्तपुर कुष्ठधामात सामुहिक आत्महत्या केली होती, शासनाची शेतकरी विरोधी धोरणे व त्यातुन शेतीव्यावसायात झालेली विदारक अवस्था हेच त्या सामुहीक मरणकांडामागील प्रमुख कारण होते, तेव्हापासुन आजतागायत शेतकरी आत्महत्यांची मालिका देशभरात सुरूच असुन ४ लाखांपेक्षा जास्त शेतक-यांनी मागील काही वर्षात चुकीच्या सरकारी धोरणांमुळे आपले आयुष्य संपवले असुन शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी, शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या १) कमाल शेतजमीन धारणा(सीलिंग)कायदा, २)आवश्यक वस्तु कायदा ३)जमीन अधिग्रहण आदि नरभक्षी कायद्यांचा विरोध करण्यासाठी वरील ३ कायद्यापैंकी कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग)कायदा राज्य सरकारच्या आधीन आहे तो मुळातुन रद्द व्हायला हवा, परंतु जर सरकारला तसे करणे शक्य होत नसेल तर किमान शेतकरी उत्पादक कंपन्यांना सीलिंग कायद्यातून वगळण्याची तात्काळ तरतूद करावी.,अशी तरतुद सीलिंग कायद्याच्या कलम ४८ मध्ये करता येऊ शकते ती करण्यात यावी तसेच आवश्यक वस्तु कायदा रद्द करण्याची शिफारस तसेच खाजगी प्रयोजनासाठी सरकारला जमीन अधिग्रहण करता येणार नाही अशी दुरूस्ती राज्य सरकारने केंद्र सरकारला सुचवावी. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असुन शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी "योजना " तयार करणे पुरेसे नसून कायद्याच्या बेड्यातून शेतक-यांना मुक्त करणे गरजेचे आहे त्या दृष्टीकोनातून सरकारने पाऊले उचलावीत या मागण्यांसह शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्त करत नरभक्षी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधान सचिव, कृषिमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना करण्यात आली आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी