वीजप्रश्नी लेखी अश्वासानंतर शेतकर्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे
By : Polticalface Team ,Wed Mar 23 2022 13:47:11 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :-
श्रीगोंदा तालुक्यातील
रायगव्हाण,राजापूर,माठ,येवती ढवळगाव म्हसे व इतर काही गावातील तसेच शेतकऱ्यांची पिंपरी चौफुला सबस्टेशने जणू काय चेष्टा लावली की काय असे दिसून येत आहे, सर्वच शेतीमालाचा भाव पडलेला असल्यामुळे अधिच शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे व आता हाता तोंडाला आलेला शेतीमाल पाण्यावाचून डोळ्यादेखत शेतात पाण्या विना जळून चाललेला दिसत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग अतिशय भयान संकटामध्ये सापडलेला आहे व त्यामध्ये या भागामध्ये सध्या तरी पाण्याची शेतीसाठी थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे परंतु विज महामंडळाने आठ ते दहा दिवसापासून पूर्ण वीज कनेक्शन विस्कळीत केली आहे , पाच पाच मिनिटाला लाईट जाणे,होल्टेज कमी जास्त होणे रात्रीची लाईट सोडणे,दोन दिवस लाईट न येणे यामुळे शेतकरी पूर्ण हैराण झालाय या सर्व वीज महामंडळाच्या मनमानी कारभाराला कंटाळून या गावातील शेतकऱ्यांनी थेट दिनांक 22 मार्च रोजी पिंपरी कोलंदर चौफुला येथील सब स्टेशन पुढे शिरूर-श्रीगोंदा रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा तहसीलदार,बेलवंडी पोलीस स्टेशन, व सबस्टेशन पिंपरी चौफुला यांना दिला होता व 22 मार्च रोजी सर्व या गावातील शेतकरी सकाळी नऊ ते दहा च्या सुमारास हळूहळू शेतकरी वर्ग जमा झाला परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्ता रोको मध्ये सामील झाल्यानंतर सब स्टेशन मधील कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ झाली,बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बोत्रे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, शेतकरी आक्रमक झालेला दिसले असतातच उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बेलवंडी उपविभागीय अधिकारी मांडुळे साहेब,व बारहात्ते साहेब यांनी शेतकऱ्यांना २२० के.व्ही. लोणी व्यंकनाथ येथुन कोळगांव, बेलवंडी, येळपणे, पिंपरी कोलंदर, मढेवडगांव, इ. उपकेंद्रांना वीजपुरवटा करणेकामी लागणारी व्यवस्था सुरु करण्याचे काम प्रगतीप्रथावर असुन सदर काम दि. २८ मार्च २०२२ पर्यंत पुर्ण होणार आहे.त्यानंतर पुढील दोन दिवसांत वीजपुरवटा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कारण वरील उपकेंद्रांचा भार १३२ के.व्ही. श्रीगोंदा येथुन कमी होणार आहे. तरी दि.३० मार्च २०२२ पर्यंत वरील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होईल. तरी आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात यावे, अशा आशयाचे लेखी आश्वासन पत्र दिले,त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन थांबवले.
यावेळी माजी सभापती संभाजीराजे देविकर,मा.कुकडी सा.का.संचालक बाळासाहेब पठारे,धनंजय मेंगवडे, सचिन चौधरी,अशोक वाखारे,अशोक ईश्वरे गुरुजी,मोहन हार्दे,अमोल पोटावळे,प्रकाष तळेकर,विठ्ठल हार्दे, लक्ष्मण रिकामे,गणेश पवार,सुभास कुटे व रायगव्हाण,राजापूर,माठ,येवती, ढवळगाव,म्हसे या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी