स्वराज ट्रॅक्टर कडून शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन शेतकऱ्यांचे उपकार आयुष्यात विसरणार नाही : गोरखे
By : Polticalface Team ,Sat Mar 26 2022 19:06:23 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
देशात अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर आले आणि गेले मात्र भारतात तयार झालेल्या पहिल्या स्वराज ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांच्या मनात मिळविलेला विश्वास दिवसेंदिवस वाढत असून याच विश्वासास पात्र राहिल्याने शेतकऱ्यांनी चैतन्य उद्योग समूहावर कुटुंब प्रमाणे प्रेम केले. त्याची उतराई होण्यासाठी स्वराज्य कंपनीच्या चैतन्य ट्रॅक्टरच्या १० व्या वर्षाच्या पदार्पणाच्या निमित्ताने चैतन्य उद्योग समूहाचे संचालक काका गोरख यांनी श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते.
पुढे बोलताना गोरख यांनी सांगितले की श्रीगोंदा शहरात १३ एप्रिल रोजी चैतन्य उद्योग समूहाने स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर शोरुम सुरू करून तालुक्यात मागील ९ वर्षात २१४० ट्रॅक्टर खरेदी करून दाखविलेला विश्वास सार्थ ठरवीत भविष्यात देखील सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी देखील एका कुटुंबाप्रमाणे सहकार्य केल्याने चैतन्य ट्रॅक्टर राज्यात विक्री बाबत आग्रेसर असल्याचे प्रतिपादन काका गोरखे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रती आयोजित केलेल्या कृतज्ञ सोहळ्यात करत शेतकऱ्यांचे उपकार आयुष्यात विसरणार नसल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी स्वराज कंपनीचे टेक्निकल अधिकारी हेमंत बोरुडे, स्वराज उद्योग समूहाचे संचालक ऋषिकेश गोरखे, कोटक बँकेचे मॅनेजर सागर ढवळे, एल अँड टी फायनान्स कंपनीचे गोरख शेलार, इंडसइंड बँकेचे शफीक शेख यांच्यसह विमा कंपन्यांचे अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :