चंद्र, सूर्य असेपर्यंत बाबूजींचे कार्य जिवंत राहील – ह.भ.प. रामगिरी महाराज
By : Polticalface Team ,Sat Apr 02 2022 10:06:02 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
बाबुजींनी निस्वार्थीपणे आपल्या कार्याची पताका हाती घेऊन पाथर्डी तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा केली.जीवन जगत असतांना गरजू, उपेक्षित जनतेचा ज्यांनी आशीर्वाद घेतला. त्या व्यक्तींची आज जगात महती आहे. अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे स्व. बाबुजी होत.बाबुजींनी आपल्या जीवनकार्यात पुणे, मुंबई या ठिकाणी राहूनही समाजकार्य केले असते, परंतु त्यांनी आपल्या पाथर्डीसारख्या दुर्गम, दुष्काळग्रस्त भागाची निवड केली.येथील उसतोडणी मजुरांसाठी व त्यांच्या मुलांच्या हाती कोयता न येता शिक्षणाच्या माध्यमातून मागासलेपणा दूर करण्यासाठी अविरतपणे झटणे बाबुजींनी पसंत केले. जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। या उक्तीप्रमाणे समाजसुधारणेचे कार्य करणाऱ्या बाबूजींची महती चंद्र, सूर्य असेपर्यंत जिवंत राहील, असे प्रतिपादन येळेश्वर संस्थांनचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरी महाराज यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार स्व. बाबुजी आव्हाड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, श्री. विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे, डॉ. अभिमन्यू ढोरमारे आदी उपस्थित होते.
रामगिरी महाराज पुढे म्हणाले, जगात महान व्यक्तीमत्वांचीच जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली जाते. बाबूजींना त्यांच्या कार्यकाळात अनेक संत महात्म्यांचा सहवास लाभला. त्यांच्या कृपाशीर्वादाने बाबुजींनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाथर्डी सारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम केले व ते अविस्मरणीय होते. बाबूजींसारखी निस्वार्थी व्यक्ती पाथर्डी तालुक्यात पुन्हा होणे नाही, असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी रामगिरी महाराजांच्या हस्ते महाविद्यालयीन कर्मचारी बाबासाहेब पालवे यांचा सेवापुर्ती निमित्त सपत्नीक सन्मान करण्यात आला. स्व. बाबुजींच्या जयंतीनिमित्त शहरातील होतकरू विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार मुख्याध्यापक शरद मेढे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी