मराठवाड्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा बळी, नागरिकांनी थेट उन्हात जाण्याचे टाळावे

By : Polticalface Team ,Sat Apr 02 2022 12:02:43 GMT+0530 (India Standard Time)

मराठवाड्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा बळी, नागरिकांनी थेट उन्हात जाण्याचे टाळावे औरंगाबाद : राज्यात उष्णतेची लाट सुरु असून मराठवाड्यातील जिल्ह्यांचे तापमान वाढलेले आहे. औरंगाबादसह, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील तापमान चाळीशीपर्यंत किंवा चाळीशीपार पोहोचले आहे. तसेच पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहून काही अंशी तापमानात वाढ संभवू शकते, अशा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान जे व्हायला नको होते तेच घडले असून उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघातामुळे या वर्षातील पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. औरंगाबादमध्ये मार्च महिन्यातही उष्णतेची लाट आली होती. तेव्हादेखील सकाळी 9 वाजताच तापमानाचा पारा 40 पर्यंत पोहोचलेला असायचा. आता मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही पुन्हा एकदा शहरातील तापमान 41ते 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. राजस्थान तसेच गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण तसेच कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुक्काम 2 एप्रिलपर्यंत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतरही काही दिवस तापमानातील वाढ कायम राहिल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघातामुळे या वर्षातील पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. काल जिल्ह्यातील लिंबराज सुकाळे या 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने त्याने घाई-घाईत पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उष्माघाताचा झटका आला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ उपचारासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. येत्या तीन दिवसात मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असल्याने शेतकरी आणि अन्य नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी जनावरांना सावलीत बांधावे,नवीन लागवड केलेल्या फळ झाडांना सावली, अच्छादन करावे, असे आवाहन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मौसम सेवा केंद्रातील प्रमुख प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी