मराठवाड्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा बळी, नागरिकांनी थेट उन्हात जाण्याचे टाळावे

By : Polticalface Team ,Sat Apr 02 2022 12:02:43 GMT+0530 (India Standard Time)

मराठवाड्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा बळी, नागरिकांनी थेट उन्हात जाण्याचे टाळावे औरंगाबाद : राज्यात उष्णतेची लाट सुरु असून मराठवाड्यातील जिल्ह्यांचे तापमान वाढलेले आहे. औरंगाबादसह, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील तापमान चाळीशीपर्यंत किंवा चाळीशीपार पोहोचले आहे. तसेच पुढील तीन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहून काही अंशी तापमानात वाढ संभवू शकते, अशा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान जे व्हायला नको होते तेच घडले असून उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघातामुळे या वर्षातील पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. औरंगाबादमध्ये मार्च महिन्यातही उष्णतेची लाट आली होती. तेव्हादेखील सकाळी 9 वाजताच तापमानाचा पारा 40 पर्यंत पोहोचलेला असायचा. आता मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीलाही पुन्हा एकदा शहरातील तापमान 41ते 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. राजस्थान तसेच गुजरातकडून वाहणाऱ्या अतिउष्ण तसेच कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुक्काम 2 एप्रिलपर्यंत राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतरही काही दिवस तापमानातील वाढ कायम राहिल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघातामुळे या वर्षातील पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. काल जिल्ह्यातील लिंबराज सुकाळे या 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने त्याने घाई-घाईत पाणी प्यायले. त्यानंतर त्याला उष्माघाताचा झटका आला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ उपचारासाठी कळंब येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. येत्या तीन दिवसात मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असल्याने शेतकरी आणि अन्य नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी जनावरांना सावलीत बांधावे,नवीन लागवड केलेल्या फळ झाडांना सावली, अच्छादन करावे, असे आवाहन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मौसम सेवा केंद्रातील प्रमुख प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष