वाढत्या उन्हाच्या चटक्याचा पक्षांना फटका पाणी विना अनेक पक्ष्यांचा होत आहे मृत्यू ,बुधभूषण ही सामाजिक संघटना करीत आहे पक्ष्यांच्या पाण्याची सोय
By : Polticalface Team ,Fri Apr 08 2022 15:08:38 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधी अलिम शेख
वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून त्याचा फटका पक्षांनाही बसत आहे मात्र यांचे पक्ष्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्यूमुखी पडत आहे दरवर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागले की पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते या वर्षी मात्र मार्च महिन्यापासून उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्षांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे
उन्हाळा सुरू झाल्यावर सामान्य माणसापासून प्राण्यांपर्यंत सगळ्यांनाच चटके बसू लागल्याने प्रत्येक जण पाणी अथवा थंड दाव्याच्या शोधात असतो अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे माणसाच्या गरजा तात्काळ पूर्ण होतात मात्र प्राणी व पक्षी यांना नैसर्गिक स्त्रोत त्यामधूनच या गरजा भागवल्या जात असल्याने त्यांच्या पुढे अडचणी निर्माण होतात यात कोणाचा जास्त फटका पक्षाला बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरवात होते त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे असे गंभीर प्रकार पक्षाबाबत घडतात
शहरातील व ग्रामीण भागातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने त्याचा पक्षाच्या घरट्यावर परिणाम होत आहे तसेच नागरिक त्यांच्या घरात अथवा इमारतीत होणारी पक्षांची घरटी काढून टाकतात त्यामुळे आधीच झाडावर करते करू न शकल्याने हे पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याच्या पर्याय न मिळाल्याने बळी पडतात तसेच एखाद्या प्राणी मित्राने ठेवलेले पाणी पक्षी खराब करतील या उद्देशाने अनेक जण ते पाणी उपडे करतात त्यामुळे ही पक्षांना पाणी मिळत नाही
चौकट घेणे
बुधभूषण फाउंडेशनचा पक्षांसाठी असा एक आगळा वेगळा उपक्रम
बुधभूषण फाऊंडेशन ही सामाजिक संघटना असून सदरची सामाजिक संघटना गेली पाच वर्षापासून पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी चंचुपात्र बनवत असून सदर सामाजिक संघटनेने आज पर्यंत विविध शैक्षणिक संस्था शासकीय कार्यालय रेस्ट हाऊस वनविभाग आदी ठिकाणी पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचे चंचुपात्र बनवले आहे यामुळे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एक प्रकारे प्रश्न मिटत असून सदरची बुधभूषण फाउंडेशन सामाजिक संघटना संपूर्ण राज्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवीत असल्याचे बुधभूषण फाऊंडेशनचे चेअरमन दुर्गेश राठोड व सचिव अमोल दुरंदे यांनी जन आधार न्यूज 24 शी बोलताना माहिती दिली
वाचक क्रमांक :