आज योग दिनाचे महत्त्व व गरज

By : Polticalface Team ,20-06-2025

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

लिंपणगाव (प्रतिनिधी )21 जून हा पृथ्वीवराचा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याचे दक्षिणायान सुरु होते. योगविद्येत या दिवसाला विशेष महत्व आहे. त्यामुळे मानवाच्या सर्वांगिण विकासासाठी वरदान ठरणाऱ्या योग साधनेची 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भारताला योगाची प्राचीन परंपरा आहे. भारतानेच पाश्चात्य देशांना योग्य विद्या शिकवली. आज त्याचा प्रसार आणि प्रचार सर्व जगात होतो आहे.

   

   योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या सर्वांना ईश्वराशी जोडणे होय. योग म्हणजे बुध्दी, मन, भावना आणि संकल्प यांचे नियमन होय. योगात यम, नियम, आसान, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना खूप महत्व आहे. योगाची व्याख्या जरी चित वृती निरोध अशी केली तरी शरीर, इंद्रिये, मन, बुध्दी, अहंकार, चित्त, विवेकबुध्दी, यांना संस्कारीत करण्याची प्रक्रिया योगामुळे प्राप्त होते. योगामुळे मन प्रसन्न, आनंदी राहुन शरीर लवचिक, कार्यक्षम आणि निरोगी राहाते.

योग आणि प्राणायामामध्ये श्वासाला खूप महत्व आहे. मानवी फुफ्फुसात जवळ-जवळ 7 कोटी 30 लाख स्पंजासारखे कोष्टक असतात. योग आणि प्राणायामाशिवाय त्यांना पुर्ण प्राणवायु मिळत नाही. माणुस 1 मिनिटाला 15 श्वास घेतो. कासव 1 मिनिटाला फक्त 5 श्वास घेते म्हणुन कासव 400 वर्षे जगते. प्राणायाम व ध्यानाच्या सरावाने योगी 4 पर्यंत श्वाससंख्या आणु शकतो व तो योगी आपले आयुष्य 400 वर्षापर्यंत प्राप्त करु शकतो. प्राणायाममध्ये श्वास आत घेणे-पुरक, श्वास आत रोखणे - कुंभक, बाहेर सोडणे-रचेक व श्वास बाहेर रोखणे याला बाह्य कुंभक म्हणतात.

निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित सूर्यनमस्कार घालावेत. त्यात 8 आसनांचा अभ्यास होतो. या आसनाला आसनांचा राजा म्हटलेले आहे. निरोगी राहण्यासाठी मंत्रोचारासहीत किमान 12 सूर्यनमस्कार घालावेत. याचबरोबर उभे, बैठे, पाठीवरील व पोटावरील काही आसने करावीत. ज्यामुळे रक्ताभिसरण व शरीराचे चलनवलन चांगले राहील. म्हणूनच शरीर माध्यम खलु धर्म साधनम असे म्हटले आहे. शरीर सुदृढ व निरोगी असेल तर मनात येणारा प्रत्येक विचार हा एक वेगळी उर्जाशक्ती घेऊनच बाहेर पडतो. मानवी शरीरात एकुण 72 कोटी 10 लाख 10 हजार 210 नाड्या असतात. तसेच 350 सांधे व 370 हाडे असतात. मानवी शरीर बाहेरील औषधापेक्षा आंतरिक उर्जेमुळे अतिशय चांगले, स्वस्थ व ऊर्जावान बनते. आंतरिक शक्ती ही सर्व श्रेष्ठ शक्ती आहे. ती जागृत करण्यासाठी फक्त आणि फक्त श्वास नियंत्रण अति महत्वाचे आहे. यासाठी श्वास घेणे व सोडणे गती महत्वाची आहे.  यात कुंभक, रचेक, दीर्घ श्वास घेणे व सोडणे.

जीवन सुदृढ होते  श्वासाने. संपते श्वास बंद पडल्याने. श्वास अभ्यासामुळे जीवन, मन, शरीर, सर्व प्रकारचे आजार ठीक करता येतात. शारीरीक, मानसिक, बौध्दीक विकासासाठी वरील अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. प्रचंड ताकद या अभ्यासात आहे.

आज दर 5 माणसांमागे 1 माणुस विविध आजाराने त्रस्त आहे त्यात बी.पी., मधुमेह, थॉयराईड, कॅन्सर, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, नेत्रविकार, सांधेदुखी, मणक्याचे आजार, मानसिक आजार इ.चा सामावेश होतो. तसेच तणाव पुर्ण जीवनशैली हेच अनेक व्याधींचे मुळ आहे.

योग्य आहार, व्यायाम आणि विश्रांती हीच खरी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्याच जोडीला सूर्यनमस्कार, विविध प्रकाराची आसने, मौन, ध्यान धारणा, प्रसन्न मन, आनंदी वृत्ती, निकोप आचार, विचार यांची खरी गरज आहे.

आजचे तरुण हेच खरे उद्याचे नागरिक आणि देशाचे आधार स्तंभ आहेत. त्यांच्यात योगाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शालेय स्तरावर योगा विषयाचा अभ्यासक्रमात सामावेश करावा. मगच खऱ्या अर्थाने जागतिक योगदिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे मला वाटते. 

          शब्दांकन:-  श्री.राहिंज बी.के.(योगशिक्षक)

                      श्रीगोंदा


          संकलन :-नंदकुमार कुरुमकर पत्रकार


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

संत बाळूमामा व संत ज्ञानोबाराय बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मिक वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन‌ ------------- ह.भ. प. दंडवते महाराज

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत करमाळा येथील नगरपालिका शाळा क्रमांक दोनचा विद्यार्थी राजवीर हांगे यांचा राज्यात पाचवा क्रमांक

आई ही जीवनाची गरज तशी ए आय हि काळाची गरज- मा. राजेंद्र दादा नागवडे

छत्रपती कॉलेजमधील ३० विद्यार्थ्यांची रोजगार मेळाव्यातून नोकरीसाठी निवड!

वडगाव चे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

करमाळा तालुक्यातील अधिकारी यांचा मुंबई मध्ये स्नेहभेट कार्यक्रम होणे कौतुकास्पद उपक्रम- अजय साखरे

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पिडीत महीलांची सुटका

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांचा चोख बंदोबस्त. पुणे सोलापूर प्रवासी वाहतूक व्यवस्था तात्पुरती वळवली.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमनापूर्वीची तयारी यवत ग्रामस्थ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज.

श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा श्री व्यंकनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांना योग दिनाचे प्रात्यक्षिके

लेफ्टनंट कर्नल नीलकंठ जठार यांची पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सदिच्छा भेट

मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथील गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन

आठवण शाळेची....उत्सव मैत्रीचा.. तब्बल 38 वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र. 2009 पासुन विद्यार्थ्यांची छडी बंद झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .

पद्म पंडित प्रतिष्ठानच्या वतीने कंदर येथे गुणवंतांचा सत्कार तसेच शालेय विद्यार्थ्यांना बॅग तसेच पाण्याची बॉटल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

आज योग दिनाचे महत्त्व व गरज

राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या सदस्यपदी आण्णासाहेब जगताप यांची निवड

पारधी समाज रस्त्यावर, शासनाच्या योजनांपासून वंचित पक्क्या घरासाठी प्रशासनाकडे वंचितचे निवेदन

अज्ञात 5 इसम दोन मोटार सायकलवर आले. मानेवर सुरा ठेवून 3 लाख 52 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले

जावजीबुवाची वाडी ते होले वस्ती मार्ग (रस्ता ग्राम १७७) कॅनल पूलावरून जड वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.