By : Polticalface Team ,24-08-2024
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षेमुळे पाच दिवसांपासून सरस्वती पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद
श्रीगोंदा प्रतिनिधी
काष्टी ते सिध्दटेक रोडवर पेडगाव येथील सरस्वती नदीवरील पुलाचे काम
सुरू असुन बाजूने काढलेला बायपास रस्ता गेल्या पाच दिवसांपुर्वी पावसांच्या पाण्यामुळे वाहुण गेल्याणे
गेल्या पाच दिवसांपासून वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे
सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीगोंदा यांच्या दुर्लक्षेमुळे सामान्य नागरिकांना व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
गेल्या अनेक वर्षांपासून या सरस्वती नदीवरील पूल बांधण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती
श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी याचा पाठपुरावा करून
कामाला मंजूरी मिळाली
परंतु ऐन पावसाळ्याच्या दिवसात संबंधित ठेकेदाराने
जुने पुल खोदकाम करून या जागेवर जवळपास पंधरा फुटा चा खड्डा खोदला व बाजूने काढलेल्या बायपासची निवेजन करता आले नाही
आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीगोंदा यांच्या अधिकाऱ्याने याकडे तर पाठच फिरवल्यामुळे साहेब उघडा डोळे बघा नीट अशी म्हणण्याची वेळ आली आहे
मोहीते खराडे वस्ती, काझी वस्ती, हवालदार वस्ती, ओगले नगर,
येथील जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे तसेच स्थानिक शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे
या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून या पुलाच्या बायपासचे नियोजन लवकरात लवकर करणे खूप गरजेचे आहे