By : Polticalface Team ,26-08-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २५ ऑगस्ट २०२४ दौंड तालुक्यातील मौजे पाटस येथे पुज्य भंन्ते तिस्सावरो (हरिश्चन्द्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा पानसरे यांचे शुक्रवार दि.२३ रोजी दिल्ली येथे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले असल्याने त्यांचा अंत्यविधीसाठी दि २५ रोजी पाटस येथे आठवले आले होते.
अंत्यविधीचा सर्व कार्यक्रम आटपून परत जाता वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांनी यवत ता दौंड येथील भिम सैनिकांना भेट दिली. या प्रसंगी दौंड तालुक्याचे माजी उपअध्यक्ष व जन आधार न्यूज दौंड तालुका प्रतिनिधी अनिल गायकवाड. डॉ संतोष बडेकर. माजी पोलीस उपनिरीक्षक बबनराव गायकवाड. प्रभात वृत्त पत्राचे प्रतिनिधी मनोज खंडाळे. पत्रकार संतोष जगताप. पत्रकार संजय सोनवणे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर. दिलीप दोरगे. दुध उत्पादक शेतकरी नवनाथ कुडीतकर. यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांचे स्वागत केले.
या वेळी यवत पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक युवा तरुण कार्यकर्ते तसेच सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवरांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ रामदास आठवले यांच्याशी संवाद साधला. कासुर्डी जावजीबुवाची वाडी येथील दुध उत्पादक शेतकरी नवनाथ कुडीतकर यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी बाबत व्यथा मांडल्या. या प्रसंगी यवत येथील चहाचा स्वाद घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवत येथील उत्कृष्ट चहाचा स्वाद घेऊन कौतुक करत समाधान व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची परस्तीती पाहता ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नसल्या बाबत खंत व्यक्त कली. स्थानिक पातळीवर युवा तरुणांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दौंड तालुक्यातील महायुतीचे राजकारण फक्त वरच्या फळीत चालले असल्याचे अनेक वेळा उघडकीस आले असल्याची दौंड तालुक्यातील युवकांमध्ये चर्चा आहे. या बाबत दौंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. पुढील येणाऱ्या विधानसभा नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मा.सुप्रिया सुळे यांना तत्पूर्वी निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा दिला होता. आता पुढे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रसंगी पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यवत पोलीस स्टेशनचे पाच पोलीस कर्मचारी हायवे रोडवर तैनात करण्यात आले होते. या वेळी पुणे सोलापूर महामार्ग पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.